Saturday, 30 August 2014

एखाद्याचे केस पांढरे झाले म्हणून त्याचे शहाणपण, प्रगल्भता मापता येत नाही. ज्ञानेश्वरानी १६ व्या वर्षीच जे तेज दाखविले त्याला तोंड नाही. किती जगलात त्यापेक्षा कसे जगलात हे महत्वाचे आहे. त्या कसोटीवर तळोदे तालुका पत्रकार संघाचे वय अवघे एक वर्ष असताना जे उपक्रम राबविले, ज्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले त्यामुळे सर्व तालुक्यातील जनता स्तिमीत झाली. अर्थातच हे सारे उपक्रम यशस्वी झाले ते दानशूर व्यक्ती, गुणग्राहक समाज व पत्रकार संघाची विश्वासहर्ता यामुळेच. स्वत:च्या पोळीवर तूप ओढुन घेणारे अनेक असतात. काही महाभाग तर दुस-याचेही तुप ओढुन घेणारे असतात. पण हां पत्रकार संघ संस्कृती जपणारा आहे. विकृती जोपासणारा नाही हे उन, वारा, पावसात, थंडीत काल जगात व आपल्या गावात काय घडले त्याची वित्तबातमी
पोहचवणारे घरोघरी वृत्तपत्र पोहचविणारी कष्टकरी मंडळी प्रकाश परदेशी, रविंद्र शिंपी, श्रावण परदेशी, किशोर शिंपी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते घडवुन आणला ही कृतज्ञता अनेकांना भावली तशा भावनाही त्यानी व्यक्त केल्या. म्हटले जाते - जरी ते खरे नसले तरी. याउलट एक पत्रकार दस-या पत्रकाराला कधीच चांगले म्हणत नाही. पण हां पत्रकार संघ चांगल्याचे कौतुक करतो व एकत्रही राहतो एकोप्याने काम करतो हे एक सुखद आश्चर्यच आहे. सतेचा गुळाला मुंगळा चिकटावा किंवा खुर्चीला ` फेविकोलका मजबूत जोड़ ' ही फिका पडावा, अनुभव सर्वाना येतात असे, पण या पत्रकार संघाच्या पदाधिका-यानी वर्ष झाल्याबरोबर राजीनामे दिले व नविन कौल घेतला. आजचा जगात काही पुढारी पत्रकार पाळतात, काही पोलीस पाळतात, काही उद्योगपती पाळतात, असे प्रख्यात पत्रकार एम्.जे.अकबर म्हणतात. पण या पत्रकार संघातील सद्स्यानी कोणी पाळु शकणार नाही. आजकाल सारेच विकाऊ नाहित. म्हणुनच टिकाऊ असतात ह्यामुळे जनतेचा विश्वास सर्व सदस्य गमावणार नाहित असा आम्हालाही विश्वास आहे. त्यामुळे आम्ही या पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त मनापासून शुभेच्छा देतो व पुढील दमदार वाटचालीस साथ देण्याची ग्वाही देतो.
                                                                                                      प्रा. ए.टी.वाघ ९४२३४९७००३

No comments:

Post a Comment